वास्तव
स्वीकारा आणि त्याचा सामना करा
दोन
मित्र प्रवास करत होते. वाटेत काही कारणावरून त्यांचे भांडण झाले आणि एकाने
दुसऱ्याच्या गालावर एक जोराचा थप्पड मारला. ज्याला मार बसला, त्याने काही न बोलता वाळूत लिहिले, "आज माझ्या
मित्राने मला मारले."
ते
एकमेकाशी काहीही न बोलता पुढे चालले असता, गालावर मार बसलेला मित्र दलदलीत अडकला आणि दुसऱ्याने त्याला वाचवले.
तेव्हा त्याने एका दगडावर कोरले, "आज माझ्या मित्राने
माझे प्राण वाचवले."
त्याच्या
मित्राने विचारले, "मार खाल्ल्यावर
वाळूत का लिहिलंस आणि मदत मिळाल्यावर दगडावर कोरलंस?" त्याने
उत्तर दिले, "वाईट गोष्टी वाळूत लिहाव्यात जेणेकरून
त्या सहज नष्ट होतील, आणि चांगल्या गोष्टी दगडावर कोराव्यात
जेणेकरून त्या कायम स्मरणात राहतील." वास्तव स्वीकारा आणि दुःख वाळूवरील
रेषेसारखे विसरून जा, पण चांगल्या गोष्टी कायम स्मरणात ठेवा.